देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून सर्वत्र गुन्हेगारी वाढली- सुप्रिया सुळे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले तेव्हापासून गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
महाराष्ट्र पोलिसांच्या सातत्याने बदल्या करण्यात येत असून त्यांना पारदर्शकपणे काम करु दिले जात नाही.
देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीपदाची जबाबदारी संभाळण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असे त्या म्हणाल्यात.
गेल्या 15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुन्हेविषयक नवे विधेयक मांडण्यात आले, त्याबाबत सुप्रिया सुळे बोलत होत्या.