मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. त्यामुळे मागील तीन-चार दिवसांपासून सरकारच शिष्टमंडळ आणि प्रशासन सतत जरांगे यांच्या संपर्कात आहेत.
त्यामुळे याबाबत आज अंतिम अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या नवीन अध्यादेशानंतर कुणबी नोंदी सापडलेल्या 52 लाख मराठा बांधवांसोबत त्यांच्या रक्ताच्या नात्यातील सग्यासोयऱ्यांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे.