सरकार यंत्रणेचा गैरवापर करत आहे दिशा सालियन प्रकरणी आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ज्यांची त्यांना भीती वाटते त्यांना बदनाम करण्याचे काम करत असल्याचे प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले.
याशिवाय सरकार यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नाही तर गुजरातच्या हिताचे आहे. मुंबई जशी विकली जाते तशी देश विकणार नाही. तसेच 31 डिसेंबरला सरकार पडेल, असा अंदाजही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.