प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने मविआची धाकधूक वाढली
लोकसभा निवडणुकीबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी एकत्र यावे ही माझी भावना आहे.
पण मला हे शक्य दिसत नाही. उद्या हे सर्व एकत्र नाही आले तर वंचित 48 जागा स्वबळवार लढेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महाविकास आघाडीला यामुळे मोठा धक्का असू शकतो. वंचितच्या वाट्याला 2 जागा येऊ शकतात, पण त्यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले.