बीएमसीच्या कारभाराची श्वेतपत्रिका निघणार
मुंबई महानगरपालिकेच्या 25 वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश शिंदे सरकारने दिल आहेत. श्वेतपत्रिका निघणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज (मंगळवार) दिली.
यामुळे उध्दव ठाकरे आणि कुटूंबियांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यावरून ठाकरे गट आक्रमक झाला.
त्यांनी इतरही मनपांच्या चौकशीची मागणी केली. तुम्ही स्वच्छ असाल तर घाबरण्याची गरज काय? असे मंत्री दीपक केसरकरांनी ठाकरे गटाला सुनावले.