Type Here to Get Search Results !

औसा | त्वरीत दुष्काळ जाहीर करा व पिक विम्याची २५% अग्रीम रक्कम तात्काळ द्या- औसा काॅग्रेस कमिटीची मागणी



औसा तालुका त्वरीत दुष्काळग्रस्त जाहीर करुन पिक विम्याची २५% रक्कम अग्रीम रक्कम तात्काळ द्या- औसा काॅग्रेस कमिटीची मागणी


चालु बाकी कर्जदार राहिलेल्या शेतकऱ्यांचे ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे


औसा प्रतिनीधी मुखतार मणियार 


 औसा तालुक्यामध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले असल्यामुळे खरीपाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे शेतकरी खुप आर्थिक अडचणीत सापडला आहे. परतीचा मान्सुन न आल्यामुळे रब्बीचा हंगाम पुर्णतः हाताबाहेर गेला असून तालुक्यात पेरणी झालेली नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. या नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना शेतकरी वर्गाला आधार देण्यासाठी त्वरीत पिक विम्याची 25% आग्रिम रक्कम तात्काळ द्यावे तसेच तालुक्यातील अनेक चालु बाकीदार कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आणखीन शासनाने 50 हजार सानुग्रह अनुदान जमा केले नाही.तरी तेही तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. आणि संपुर्ण औसा तालुका दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा.अन्यथा वरील मागण्या १० दिवसाच्या आत मान्य नाही झाल्यास औसा तालुका काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन काॅग्रेस कमिटी औसा तर्फे तहसीलदार औसा मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले असून यावर तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी,शहराध्यक्ष शकील शेख,उपाध्यक्ष ज्ञानोबा जोगदंड,शाम सुर्यवंशी,निर्गुण साळुंके,तानाजी पाटील,भास्कर पवार,खुनमीर मुल्ला ,संजय लोंढे,रामचंद्र शिंदे,शिवराज सुर्यवंशी,शुभम बाजुळगे,इम्रान पटेल,सिद्दीकी पिरजादे,व महेबुब कारभारी आदींच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad