20 हजार कोटींच्या घोटाळ्यात उद्धव ठाकरे संकटात
किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील फ्लॅट घोटाळा प्रकरण बाहेर काढले आहे. 35 हजार फ्लॅटच्या प्रकल्पात 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचे कारस्थान रचल्याने सांगत सोमय्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. उद्धव ठाकरे सरकारने मार्च 2022 मध्ये मुंबईत 35 हजार प्रकल्पग्रस्तांसाठी फ्लॅट बनविण्यासाठी कंत्राट काढले. शाहिद बलबा आणि अतुल चोरडिया या बिल्डरांना 6 कंत्राट दिले, असे ते म्हणाले.