कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करत 4 मुख्यमंत्र्यांची कुंडली मांडली
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीवरुन हल्लाबोल केला. कंत्राटी भरतीचे पाप हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील सरकारचे असून हे पाप आम्ही वाहणार नाही. त्यामुळे कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करत असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. यावेळी त्यांनी कंत्राटी भरती महाराष्ट्रात कधीपासून सुरु झाली याची कुंडलीच मांडली. उध्दव ठाकरे,सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना किती आणि कशाप्रकारे कंत्राटी भरती आणल्या गेली हे फडणवीसांनी सांगितले.