जागा एकमेकांना सोडायला कार्यकर्ते तयार नाहीत, जागावाटपाच्या चर्चांना ब्रेक
महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झालेली आहे. यावेळी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाचा तिढा मोठा निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जागा वाटपासंदर्भात सुरू असलेल्या प्राथमिक चर्चा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकानंतरच सुरु करण्याकडे काँग्रेसचा कल असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, 2019 च्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काँग्रेसला मान्य नाही. नवीन फॉर्म्युला तयार करण्याचा आग्रह काँग्रेसचा असल्याचा पाहायला मिळतोय. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना जागा सोडायला तयार नसल्याची चर्चा आहे.