जांबुड गावात मराठा आरक्षण साखळी उपोषण समर्थनार्थ कॅन्डल मार्च !
श्रीपुर प्रतिनिधी
जांबुड( ता माळशिरस):-मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अनेक दिवसांपासून मराठा युध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषण समर्थनार्थ मौजे जांबुड येथे कॅन्डल मार्च मोर्चास सुरुवात पांडूरंग मंदिरापासून करत संपूर्ण गावातून कॅन्डल मार्च मोर्चा काढण्यात आला यावेळी लहान मुला ,मुलीचा,महीला ,युवक पुरूष,हातामध्ये मेणबत्ती घेऊन जय भवानी जय शिवराय ,अरक्षण आमच्या हक्कच नाही कोणाच्या बापाच,कोण म्हणतंय देत नाहीत घेतल्या शिवाय राहत नाही.,एक मराठा लाख मराठा.अश्या घोषणा देत सर्व समाजातील समाजातील बांधव
मोठया संखेने सहभागी झाले होते.
या कॅन्डल मार्च मोर्चा ची सांगता श्री पांडूरंग मदीर येथे करण्यात आली. अनेक समाज बांधवांनी मराठा आरक्षण संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करत मराठा आरक्षण ही येणार्या काळाजी गरज आहे सांगून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केल्या उपोषण समर्थनार्थ कॅन्डल मार्च मोर्चा साळखी उपोषण करण्याचा निर्धार केला. त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता राष्टगीत घेऊन करण्यात आली.
सकल मराठा समाज, मौजे जांबुड यांच्याकडून राजकीय नेते व पुढारी यांना गावात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. अश्या अश्याचे निवेदन अकलूज उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. त्याच बरोबर गावाच्या वेशीवर जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही.तोपर्यंत राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्यात आली असल्याचे बॅनर गाव प्रवेश व्दारावर लावण्यात आले आहे.