काल सर्वत्र माननीय पंतप्रधान यांच्या आदेशावरून 1 तास स्वच्छ भारत अभियान ना साठी द्यावा या करिता सर्व भारतातून अनेक विभागातून अनेक ठिकाणी स्वच्छ भारत ही मोहीम राबवली गेली, अनेक नेत्यांनी हातात फक्त फोटो साठी झाडू धरून फोटो सेशन केले पण यातून काही निष्पन्न झाले नसल्याचे आज डोंबिवली एम आई डी सी परिसरात दिसून आले ,
मनसे विभाग प्रमुख शशिकांत कोकाटे यांनी. डोंबिवली एम आई डी सी परिसरात आज कित्तेक दिवस रस्त्यावर पसरलेल्या घाणीचे व नागरिकांना होणाऱ्या त्रासाचे चित्र आज सगळ्यां समोर आणून ठेवले आहे , कल्याण डोंबिवली महानगर पालिका भारतात येत नाही का , लोकनेते फक्त फोटो काढाय पूर्तेच अभियान राबवते की काय असे दिसत आहे , या गोष्टी कडे महानगरपालिका कानाडोळा करत असल्याचे दिसून आले आहे , नागरिकांना होणारा त्रास हा असाच चालू राहणार की नगरपालिका येथील कचरा व घाणीची योग्य विल्लेवाट लावते हा आता बागण्याचा विषय आहे.
डोंबिवली(भानुदास गायकवाड)