उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव व औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात नामांतर विरोधी याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर 29 सप्टेंबरला सुनावणी झाली, वेळेअभावी उर्वरित पुढील सुनावणी 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सरकारच्या याबाबतच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिका मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या.अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आल्या त्यावर सुनावणी झाली व उर्वरित सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे.