सोलापूर जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे ऊस केळी डाळिंब यासह अन्य पिके जळून गेलेले आहेत उजनी धरणातून उजवा व डावा कालवा यांना पाणी न सोडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे भाडगर वीर या धरण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे माळशिरस तालुक्यातील पूर्व भागात खूप दयनीय अवस्था झालेली आहे त्यामुळे या भागातील बोरगाव ,माळखांबी, तोंडले बोलले या गावातील बंधाऱ्यामध्ये भाटघरचे पाणी सोडल्यास येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व जनावरांसाठी पिण्याचे पाणी व चाऱ्याची सोय होईल या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेने पाटबंधारे विभाग माळशिरस यांना निवेदन दिलेले आहे
माळशिरस तालुक्यातील माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात भाडगर चे पाणी मिळत असल्याने तिथला शेतकरी सुजलाम सुफलाम दिसत आहे परंतु तालुक्यातील पूर्व भागात वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे तरी तातडीने बंधाऱ्यामध्ये पाणी सोडावे अन्यथा रयतक्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे यावेळी रणजित चव्हाण, संतोष कचरे,निलेश कांबळे, प्रमोद कचरे उपस्थित होते.
उजणी धरणातुन कालव्याला पाणी आले नाही त्यामुळे शेतातील पिके जळुन गेली शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे किमान जनावरांना तरि पाणी द्यावे
रणजित चव्हाण
शेतकरी