कल्याण ( भानुदास गायकवाड)
कंत्राटी सफाई कामगार आणि वाहनचालक सन २०१७ पासून ते सन २०२३ पर्यंत कल्याण डोबिवली महानगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे "भारत स्वच्छता अभियान" अंतर्गत हातभार लावत साफसफाईचे काम जबाबदारीने करित असताना ७ वर्षात आज पर्यंत एकही महिन्याचा पगार पालिके अंतर्गत असलेल्या प्रथम मे. विशाल एकस्पर्ट प्रा. ली. आणि आता सेक्युअर वन सेक्युरिटी सर्व्हिसेस या ठेकेदारानी आजपर्यंत प्रत्येक महिन्याला कधीच वेळेवर केलेला नाही.
प्रत्येक महिन्याला पालिकेचा कंत्राटी सफाई कर्मचारी दुसऱ्याकडून भिक मागून आपले घर चालवतो ही निंदनीय बाब आहे. तसेच गेली ७ वर्षांपासून कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले जात नाही. साबन, हँग्लोज, मास्क, रेनकोट, गमबूट इत्यादी सेफ्टी साधन दिले जात नाही. कोणत्याही प्रकारे घरभाडे, भत्ता किंवा वार्षिक शासकीय बोनस या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना दिला आहे नाही. कंत्राटी सफाई कर्मचारी या सर्व सुखसोयीपासून वंचित असून हे सर्व कुणाच्या घशात जाते.? यातील ठेकेदाराचा पाठीराखा कोण.? हे सर्व पालिकेच भांड उघड्यावर ? अश्या प्रकारे कर्मचाऱ्यांची मानसिक, आर्थिक शोषण आणि कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असून सुद्धा उपायुक्त अतुल पाटील यांचा ठेकेदारास पाठिंबा असावा किंवा ते मोदक खात बसले असावेत असा समज सफाई कर्मचाऱ्यांच्या मनात सतत येऊ लागला आहे.
ज्यांना सफाई कर्मचाऱ्यांच्या कष्ठाची जाणीव नसेल आणि फक्त पालिकेचे अवॉर्ड मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार करित असतील तर अश्या अधिकाऱ्याला नागरिकांनी एक दिवस त्याची जाग नक्की दाखवली पाहिजे.? अशी सफाई कर्मचाऱ्यांची विनंती आहे. प्रत्येक सणापासून सफाई कर्मचारी कुटुंबासहित वंचित असतील तर ते उपायुक्तांना लाजिरवाणी गोष्ठ आहे. त्यामुळे आम्ही कंत्राटी सफाई कर्मचारी प्रत्येक वार्डात उपायुक्तांचा पाठींबा असलेल्या ठेकेदाराने पगार न दिल्यामुळे अतुल पाटील यांच्या नावाने प्रत्येक घरातून कचरा मागतो तसाच मोदक मागून त्यांना नेऊन देऊ आणि नंतर उपायुक्त तेच मोदक आमच्या कुटुंबासाठी देतील तेव्हाच आमचा गणपती बाप्पा मोरया होईल. असे कामगारांकडून सांगण्यात आले.