उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण येथे अनेक गैरसोयी असल्यामुळे दुसरी वास्तु नवीन बनवण्यात आलेली आहे व कित्तेक दिवस ती वापरात न आणता तशीच धूळ खात पडली आहे ,वास्तू तयार स्तीथीत असताना अजून ती वापरात का आणली जात नाही असा प्रश्न जनता विचारात आहे उद्घाटनाला विलंब का ?परिवहनमंत्र्यांना वेळ नाहीये का ?परिवहन आयुक्तांना वेळ नाहीये?
जर परिवहन मंत्र्यांना किंवा आयुक्तांना जर वेळ नसेल तर जनतेचया हस्ते या वास्तूचे उद्घाटन करून करोडो रुपये खर्च करून बांधलेली वास्तू जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा जनतेचा पैसा करोडो रुपये खर्चून बनवलेली वास्तू जर धुळखात पडून राहत असेल तर येत्या काही दिवसांमध्ये भाजपा वाहतूकसेल जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांच्या तर्फे मोठ जन आंदोलन केले जाईल , असे सांगण्यात आले.
कल्याण प्रतिनिधी भानुदास गायकवाड