Type Here to Get Search Results !

वसमत शहरात घाणीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगांची नागरिकांमध्ये भीती



 देशपातळी पासून ते गावपातळी पर्यंत स्वच्छते करिता प्रत्येक गावाकरीता लाखो रुपयांचा निधी वितरित केला जातो.अन तो निधी नागरिकांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने केला जातो. मात्र त्या निधीची विल्हेवाट स्वच्छतेच्या दृष्टीने करणे हे काम स्थानिक प्रशासनाचे असते व त्या निधितून शहर स्वच्छतेवर भर देणे हे कामही तेवढेच महत्वाचे असते.




स्वच्छ भारत स्वच्छ शहर चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडून आव्हान करन्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे, मात्र वसमत शहराची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न येरनीवर आला आहे. वसमत शहरातील बस्थानक परिसर, बँक कॉलनी मधील स्वामी समर्थ मंदिराच्या शेजारी घाणीचे साम्राज्य वाढले असुन नागरिकांना तोंडाला रुमाल लावून त्या परिसरातून जाव लागत आहे. असेच जर घाणीचे साम्राज्य वाढत असेल तर वसमत वासियांना संसर्ग जन्य रोगांन सारख्या आजाराला तोंड द्यावं लागेल.


हिंगोली जिल्हा प्रतिनिधी बालाजी पोले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies