केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या शुल्कावर 40 टक्क्यांची वाढ. या निर्णयाविरोधात राज्यात ठिकठिकाणी शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे. तसेच शरद पवार यांनी अजित पवार गटावरही निशाणा साधला. शरद पवार म्हणाले, कांदा उत्पादकाच्या संसारात हात घालण्याच काम आज केंद्र सरकारने केले आहे. शरद पवार यांनी पुण्यात बोलताना केंद्र सरकारच्या निर्णयावरुन सडकून टीका केली.