दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव ग्रामपंचाय कार्यालयात गटारींच्या कामासंदर्भात वारंवार विनंती अर्ज करून देखील कामे झाली नाहीत. पावसाळा सुरू झाला तरी अद्याप गटारीची कामे झालेली नाहीत. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे या कामाकडे दुर्लक्ष होत असून येथील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी गावात भला मोठा खड्डा खोदला आहे. चार दिवसात जर गटारीची कामे न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंघोळ करून आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
सोलापूर | उळेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंघोळ करून गावकरी करणार आंदोलन
बुधवार, जुलै ०५, २०२३
0
Tags