जांबुड विनोद धुमाळ : येथील सुपुत्र मेजर बापूसाहेब हरिदास कचरे यांनी सी.आर. पी. एस. जवान (केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये २३ वर्ष देशसेवेचे कर्तव्य बजावून भारत मातेची अविरतपणे सेवा करून सेवानिवृत्त होऊन आपल्या गावी परतल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या बतीने तोफा हलगी, ढोल, तापे बॉजो गजरात भव्य दिव्य टु व्हीलर गॅली काढत जंगी स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्हा दूध संकलन संघाचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे प्रदेश
कार्यकारणी सदस्य राजकुमार पाटील, के के पाटील अविनाश इनामदार, पत्रकार शिवाजी धुमाळ, जांबुड लोकनियुक्त सरपंच स्वाती खटके ग्रामपंचायत सदस्या सुजाता माने, विश्रांती कचरे उपसरपंच सुहास यादव, चेअरमन राहूल खटके, माजी उपसरपंच नारायण पाटील, शिवाजी नरहरी कचरे, शिवाजी केचे समाधान नाईकनवरे सतीश पवार सचिन चंदनशिवे, भिमराव खटके जयश्री अडसुळ, भाग्यश्री भोसले बीरूदेव धोरात सुमित भोसले दादासाहेब माने हरिदास कचरे प्रकाश केचे अंबादास केचे, मुरलीधर कचरे मामा कचरे आदी उपस्थित होते.