(बीड ) पाटोदा तालुक्यातील भुरेवाडी येथील वाडीतील तब्बल 4 जनांची शासकीय सेवेमध्ये वेगवेगळ्या पदांवर निवड झाली आहे. कल्पना सुळ मुंबई पोलीस या पदासाठी निवड झाली आहे. अंजली शिंदे यांची मुंबई पोलीस या पदासाठी निवड झाली आहे. प्रताप पोले यांची मंडळ अधिकारी रत्नागिरी येथे निवड झाली आहे.
दिनकर सुळ यांची सेंन्ट्रल रेल्वे पोलिस आष्टी येथे निवड झाली आहे.
निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात प्रकाश भैय्या सोनसळे यांनी बोलताना सांगितले की प्रत्येक घरातील एक मुलगा हा शासकीय सेवेमध्ये अधिकारी झाला पाहिजे यासाठी पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे व आपला मुलगा अधिकारी कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे जर एक अधिकारी झाला तर आपलं कुटुंब हे अधिकाऱ्याचं कुटुंब म्हणून ओळखले जाईल म्हणून आपण आपल्या मुलाकडे ,मुलीकडे लक्ष देऊन शिक्षण घडवले पाहिजे.
सर्वांची निवड झाल्याबद्दल भुरेवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने सत्कार सोहळा आयोजित केला होता या सत्कार समारंभा प्रसंगी उपस्थित राहून शूभेच्छा देताना धनगर समाजाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रकाश भैय्या सोनसळे तसेच बीड जिल्हाध्यक्ष भरत गाडे ,बीड जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा शितल मतकर, पाटोदा तालुका उपाध्यक्ष अरुण काकडे ,आदींनी सर्वांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्यास गावातील माता भगिनी व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.