नार्वेकरांच्या भूमिकेमुळे शिंदे गट अस्वस्थ
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सस्ता संघर्षावरील निकालात 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 'राजकीय पक्षाला प्राधान्य द्यायचा हा मुळ मुद्दा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जुलै, 2022 मध्ये कोणता गट राजकीय पक्षाचे नेतृत्व करत होता. त्या पक्षाने व्हीप कोणाला नेमला होता, हे पाहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नार्वेकरांच्या या महत्वपूर्ण वक्तव्यामुळे शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता आहे.