वातावरणात बद्दल शेतकरी धास्तवला
ढाणकी प्रतिनिधी,दिगांबर शिरडकर. गेली दोन दिवस झाले ढगाळ वातावरण असून,सोशल मीडिया,तसेच वृत्तपत्र व न्यूज चॅनेल बातम्यात 14 तारखी पासून वादळी पाऊस सोबतच गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .त्यामुळे शेतकरी फारसा धास्तावला आहे.पावसामुळे हाता तोंडाशी आलेले सोयाबीन, ज्वारी ,मक्का,उडीद ,मुंग या सारखे पीक तोंडी आलेला घास निसटून गेले ला आहे.यातच आता रब्बी गहू,चना व हळद या सारखी पिके काही प्रमाणात काढणीस आलितर काहीना चार आठ दिवस वेळ आहे.या मुळे शेतकऱ्यांची निसर्गाच्या बद्दल या मुळे काढण्याची लगबग सुरू झाली आहे.निसर्ग हा या वर्षी शेतकऱ्यांचा जणू पिच्छा सोडत नसल्याचे चित्र दिसत आहे.पाणी ,पाऊस यातून सुटका झालेली असली तरी अनेक पिकांवर रोग राई यामुळे शेतीस खर्च अवाक्या बाहेर जास्त प्रमाणात लागत आहे.आता तर चक्क 14 तारीख ते 24 तारीख वादळी वाऱ्यासह पाऊस,गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे हाताशी आलेला रब्बी हंगाम जातो की काय,याची चिंता शेतकऱ्यास लागली आहे.सर्व शेतकऱ्यांच्या नजरा आता निसर्गाच्या बदलांकडे लागलेल्या आहेत.यातून शेतकऱ्यांच्या नशिबी आता काय पदरी पडेल कुणास ठाऊक.निसर्ग आता तारणार की मारणार शेतकऱ्यांची सुटका होईल की पदरी निराशा हे सर्व निसर्गाच्या बदलत्या हवामानावर अवलंबून आहे.इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे ,ही मन केंव्हा बळीराजाला लागू होईल व केंव्हा दिलासा मिळेल कुणास ठाऊक.