मिरची रोपांची लागवड करणा-या आदिवासी शेतकऱ्यांची संस्थेकडून व पुरवठा करणाऱ्या नर्सरी मालकाकडून फसवणूक.
जव्हार - दिनेश आंबेकर
“संस्थेकडे फसवणूक झालेल्या
भरपाईची देण्याची मागणी.”
जव्हार बातमी – जव्हार तालुक्यातील चांभारशेत, पिंपळशेत, खरोंडा, ह्या आदिवासी शेतकरी, गेल्या काही वर्षापासून रब्बी हंगामात मिर्ची पिकांची लागवड घेतली जाते, दरवर्षी वेगवेगळ्या संस्था शेतकऱ्यांना मिर्चीची रोपे देवून त्यानंतर ह्या शेतकऱ्यांना मिर्ची देखील मार्केटमध्ये बाजारभावा प्रमाणे खरेदी विक्री करून अधिक उत्पन्न करून देतात.
मात्र यावर्षी मिर्चीची रोपटे इन्क्रीश्याट या संस्थेकडून दिंडोरी येथील नर्सरी मधून शेतकऱ्यांना देण्यात आली होती. मात्र मिर्ची तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की, ईन्क्रीश्याट संस्थेने दिलेली रोपे ही बाजारात भाव नसलेल्या वेगळ्याच कुठल्या तरी जातीची मिर्ची दिली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची या वर्षीची रब्बी हंगामांची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी संस्थेकडून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चांभारशेत, पिंपळशेत, खरोंडा ह्या भागातील गरीब आदिवासी शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यात मिर्ची लागवड करून शेतीला जोडधंदा म्हणून उत्पन्न घेत आहेत. मात्र यावर्षी इन्क्रीश्याट या संस्थेद्वारे प्राईड १५१ या जातीची मिरचीची रोपे शेतकऱ्यांना दिल्याचे संस्थेने सांगितले. मात्र मिर्चीची मशागत करून मिरर्ची तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आता लक्षात आलं की, ईन्क्रीश्याट संस्थेने दिलेली रोपेही प्राईड १५१ या जातीची नसून, ही रोपे वेगळ्या कुठल्यातरी जातीची रोपटे आहेत.
ह्या वेगळ्या जातीच्या मिरचीला बाजाराभावात अजिबात मागणी नाही, शेतकऱ्यांची फसवणूक झाली झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.