महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कातकरी शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवरील वाडा येथे प्रशिक्षणाचे आयोजन.
पालघर जिल्हा प्रतिनिधी: सुनिल जाबर
प्रकल्पाधिकारी कार्यालय जव्हार तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडा येथील मॅनेजमेंट कॉलेज मध्ये कातकरी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेती व शेतीशी निगडीत व्यवसाय व त्यातून रोजगार निर्मिती कशी करता येईल या संदर्भात सविस्तर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
शेती व शेती व्यवसायाशी निगडीत लघुउद्योगातून प्रगती कशी साधता येईल या बाबतीत श्री. आघाव साहेब, सौ. निखाडे मॅडम या शिवाय इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शेकर्यांमधून सुद्धा श्री. गोविंद सवर यांनी आपले अनुभव विशद केले. महाराष्ट्रातील कातकरी समाज हा अती मागास असून शासनाने त्यांच्या ह्या अतीमागासलेपणामुळे त्यांना आदिम जमात जाहीर केले आहे. स्थलांतर, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, कुपोषण, वेठबिगारी अशा अनेक बाबतीत हा समाज अडकलेला असून त्यांना शासकीय पातळीवरून प्रामाणिक सहकार्य करणे गरजेचे आहे. असे पालघर क्षेत्र समन्वयक श्री. रविंद्र भुरकूंडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी उपविभागीय कृषी अधिकारी मा. श्री. आघाव साहेब,तालुका कृषी अधिकारी मा. सौ. निखाडे, आदिवासी विकास प्रकल्प निरीक्षक श्री. शाम चिंचमलातपूरकर, क्षेत्र समन्वयक आदिम जमाती योजना श्री. रविंद्र भुरकूंडे, ग्रामसाथी श्री दयानंद पवार, शेतकरी श्री. गोविंद सवर, देवराम मुकणे, प्रकाश सवर, पंडीत सवर यांच्यासह तालुक्यातील ५० कातकरी शेतकरी उपस्थित होते.