अखेर त्या धुमाकूळ घालणाऱ्या वानरांला पकडण्यात वनविभागाला यश
फुलसावंगी/प्रतिनिधी
गत दोन ते तीन दिवसापासून फुलसावंगी येथे वानराने अनेकांचा चावा घेत धुमाकूळ घातला होता.त्या धुमाकूळ घालणाऱ्या वानरास आज दि.१८ डिसेंबर रोजी वनविभागाच्या रेस्क्यु टिमला पकडण्यात यश आले.
गेल्या दोन ते तीन दिवसात तब्बल दहा ते बारा व्यक्तींचा चावा घेणाऱ्या त्या वानरांनी फुलसावंगीत अक्षरशः धुमाकूळ घातला होता.लहानापासून मोठ्यांपर्यंत वानराच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले होते.त्यामुळे गावकऱ्यांनी याबाबत वनविभागास कळविले होते.त्याना प्रतिसाद देत वनविभागाच्या वतीने आज त्या वानरास पकडण्यासाठी रेस्क्यु करण्यात आले.दोन ते तीन तासात त्या वानरास पकडण्यात वनविभागास यश आले.
महागावचे वन परिक्षेञ अधिकारी डि.के.मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनात शे.मुज्जवीर,शिवराज विडकर,कोब्रा ॲडवेंचर चे किरण सातपुते,पशु वैद्यकीय अधिकारी यांनी हे रेस्क्यु केले.