पोलीस भरतीचे आवेदन पत्र भरण्याची मुदत वाढवावी -राजेंद्र पाडवी(तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी चिंतेत; मुख्यमंत्र्यांना पत्र)
तळोदा(प्रतिनिधी)राज्यात पोलीस भरती १८३३१ पदांसाठी ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.परंतु,ऑनलाईन फॉर्म भरतांना तांत्रिक अडचणीमुळे विदयार्थ्यांना दिवसभर रांगेत थांबूनही फॉर्म भरला जात नाही.शासनाकडून फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर दिली आहे.तांत्रिक अडचणीमुळे पोलीस भरतीचे स्वप्न पाहणारे हजारो विद्यार्थी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.सरकारने लक्ष घालून फॉर्म भरण्याची मुदतवाढ देण्याची मागणी बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.