हिमायतनगर प्रतिनिधी जाबुवंत मिरासे
चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टी बाबत शेतकऱ्यांनी कंपनीकडे पिक विमा मिळवण्यासाठी ऑफलाइन किंवा ऑनलाईन अर्ज केले आहेत. तर काही शेतकरी बांधवांचे अर्ज करणे बाकी असताना 72 तासाच्या आतच सर्व साईड बंद झाल्याच्या तक्रारी होत असताना याच बाबीचा फायदा घेत काही दलाला कडून शेतकऱ्यांना लाऊड स्पीकर च्या माध्यमातून सूचना करून कंपनीकडे तक्रार करण्यासाठी फॉर्म भरून देण्याचे सांगितले वास्तविक पाहता कंपनीच्या नियमानुसार नुकसान झाल्यानंतर संबंधित पॉलिसी धारकांनी 72 तासाच्या आत कंपनीकडे व नेमून दिलेल्या तालुका प्रतिनिधीकडे लेखी व तोंडी व ऑनलाईन तक्रार करणे अनिवार्य असते परंतु मागील काही दिवसापूर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यामध्ये बळीराजांनी आपल्या काळी आईची ओटी भरून हातात तोंडाला आलेले सोयाबीन हे पीक वाया गेले यामुळे शेतकरी बांधवांनी विमा कंपनीकडे तक्रारी करून पिक विमा मिळावा यासाठी अर्ज केले परंतु काही शेतकरी यामधून अनावधानाने राहून गेले याच संधीचा फायदा घेत आर्थिक फायदा व राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी येथील एका स्वयंघोषित दलालांनी नामी शक्कल लढवली असून आपण स्वतः जिल्हा अधिकारी व कंपनीशी बोलणे झाले असल्याचे भासवून व एक लेखी तक्रार कंपनीच्या तालुका प्रतिनिधीकडे देऊन गावातील शेतकरी बांधवांची एक प्रकारे दिशाभूल चालवली आहे.
अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी यांनी संबंधित पिक विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी सचिन घुले आणि अंबादास देशमुख हिमायतनगर.... यांच्याशी संपर्क साधला असता ज्या शेतकरी बांधवांनी नुकसानीबाबतची तक्रार 72 तासाच्या आत कंपनीकडे केली असेल व ज्या शेतकऱ्याचे नाव यादीवर आले असेल अशाच विमाधारकांनी फॉर्म भरून द्यावे व विशेष म्हणजे आमच्या कानावर काही लोक शेतकरी बांधवाकडून पैशाची मागणी करीत असल्याचे समजले त्यामुळे कुठल्याही विमाधारकांनी कुणालाही एक रुपया सुद्धा देऊ नये असे आव्हान सचिन घुले आणि अंबादास देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर कंपनीच्या वरिष्ठाशी किंवा किंवा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी असे सुद्धा आवाहन यावेळी त्यांनी केले