किनवट प्रतिनिधी : गजानन वानोळे
किनवट तालुक्यातील नंदगाव तांडा येथील रहिवाशी असलेला शेतकरी, देवराव गंभीरा जाधव शेती सव्हें नंबर १०४ (ब) यांच्या शेतात रोही, हरीण, रानडुक्कर या वन्यप्राण्याने शेतीमधील सोयाबीन व कापसाचे बोंडी खाऊन नासधुस करून फार मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान केल्याने हा शेतकरी हतबल झाला आहे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करून योग्य तो मोबदला संबधीत शेतकऱ्याला देण्यात यावा अशी मागणी वन विभागाला केली आहे.
यावर्षी मोठया प्रमाणात अतिवृष्टीचे सावट आले असुन, तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान अतिवृष्टीच्या पावसामुळे झाले असून त्यातच तोंडावर आलेल्या शेती पिकाचे वन्यप्राण्यांकडून होत असलेले नुकसान वनविभागाला कळवले असता प्रत्यक्ष पंचनामा न करता तुम्हीच फोटो काढून आणा आम्ही वरती अहवाल पाठवू असे उत्तर वन कर्मचाऱ्यांकडून त्या हतबल झालेल्या शेतकऱ्यांना मिळाले आहे जंगल तार कुंपनासाठी लाखो रुपयांचा निधी येऊनही तारकुंपन का? केले नाही अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.