आ. राजुभैया नवघरे यांच्या हस्ते या रॅकचा शुभारंभ संपन्न झाला.
खतांचे रेल्वे रॅक पॉईंट हे हिंगोली येथे उपलब्ध होते, त्यामुळे वसमत तालुक्याला लागणारे खत हे हिंगोली येथून आणावे लागत असे, आता खतांचा रेल्वे रॅक पॉइंट वसमत येथे नव्याने निर्माण केल्यामुळे वसमत तालुक्याला खतांचा तुटवडा जाणवणार नाही.
तसेच या पॉइंट मुळे उद्योगांना चालना मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा न जाणवता त्यांना खत उपलब्ध होईल. आज वसमत येथे या पॉईंटला खतांची पहिली रॅक दाखल झाली.
याप्रसंगी डेकाटे सर RCF मुख्यप्रबंधक, केदार काचावर सर, भवर साहेब, जय पाटील सर रेल्वे विभाग, सुबोध कुमार, अनिल पडोळे, शिवा सेठ, संभाजी दगडे, छगन जमदाडे, बाहेती, चेपूरवार व इतर मान्यवर उपस्थित होते.