वसमत :वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरातील पारडी बुद्रुक, कोठारी, दांडे गाव *,कानोसा ,* सालापुर अश्या बऱ्याच गावात गेले एक महिन्यापासून जिओ मोबाईल व जियो कंपनीचे कार्ड चालत नसल्याने नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.मोबाईल ला टॉवर नसल्याने एखाद्या गर्भवती स्री चा मृत्यू होऊ शकतो. अंबुलेस ला ही फोन लागत नाही.त्यामुळे कोणत्याच नागरिकांचे काम हे व्यवस्थित होत नाही. मागे काही दिवसापूर्वी मैजे बागल पारडी येथे गावातील लोकांनी जियो च्य त्रासाला कंटाळून अखेर जियो सोडण्याचा निर्णय घेतला.असा वारंवार होणारा त्रास आणि नेहमीची कट कट या पासून दूर गेलेले बरे त्यामुळे आता गावातील लोक आयडिया,एअरटेल, व्होडाफोन,या कंपनीकडे जाताना दिसत आहेत. नेटवर्क नसल्यामुळे बरेच प्रॉब्लेम लोकांना जाणवत आहे. जियो कंपनीला कॉल केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.हा होणारा नेहमीचा त्रास कोण थांबवणार? याची चौकशी करायला नको का?या विभागाकडे कोण लक्ष देणार?असे बरेच प्रस्न नागरिकांना पडत आहेत.त्यामुळे जो कोणी अधिकारी असेल किंवा प्रायव्हेट कंपनी असेल त्यांनी तात्काळ कारवाई करून नागरिकांचे हाल दूर करावे अशी जनतेतून मागणी होताना दिसून येते.
( प्रतिनिधी: बालाजी पोले ) वसमत