छावा दल संघटनेच्या वतीने वसमत तालुक्यातील मौजे कुरुंदा किन्होळा गिरगाव व पळसगाव येथील अतिवृष्टीने ज्या घरांचे व घरातील अन्नधान्याचे नुकसान झाले आहे अशा कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी व शेतातील पिकांचे सुद्धा जास्त प्रमाणात नुकसान झाले असून शासनाकडून सदरील शेतकऱ्यांना शेतीच्या पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत देण्यात यावी
व शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत पन्नास हजार रुपये त्वरित मिळावे अन्यथा छावा दलाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा छावा दल संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी वसमत यांना निवेदन देण्यात आले यावेळी छावा दल संघटनेचे युवा जिल्हाअध्यक्ष विजेंद्र भैया क्षीरसागर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते