Type Here to Get Search Results !

कुरुंद्यात जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग, महसूल विभाग या तीन विभागांच्या टीमने केले सर्वेक्षण.




वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सतत होणाऱ्या पुर परिस्थितीवर मात करण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग, महसूल विभाग अश्या टीम तयार करण्यात आल्या आहे. 




या तीनही विभागांनी शुक्रवारी कुरुंदा येथे जाऊन परिसराची पाहणी करीत नागरिकांशी संवाद साधला. कुरुंदा परिसरातील गावामध्ये पुराचे पाणी जाऊ नये यासाठी पाहणी करण्यात आली. 




यामध्ये काय उपाय योजना करता येतील याबाबत सर्व विभागाचे मत घेतले जाणार आहे. त्यानंतर कोणत्या विभागाने कोणती कामे करायची याबाबत सुचना दिल्या जाणार आहेत.
यावेळी तहसीलदार अरविंद बोळनगे, मंडळ अधिकारी शिंदे, तलाठी गरुड, सरपंच राजेश इंगोले, छावा युवा जिल्हाअध्यक्ष विजेंद्र भैया क्षीरसागर व ग्रामस्थ उपस्थित होते. या टीमने मुख्यनदीच्या पुलावर जाऊन पाहणी केली. गावातील ग्रामपंचायत कॉम्प्लेक्स जवळील पुलाची पाहणी केली तसेच सेलू पांदन व कुरुंदवाडी कडून येणाऱ्या नदीपात्राची सुकळी रोड पुलावर जाऊन तेथील पाहणी केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय कुरुंदा येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad