या तीनही विभागांनी शुक्रवारी कुरुंदा येथे जाऊन परिसराची पाहणी करीत नागरिकांशी संवाद साधला. कुरुंदा परिसरातील गावामध्ये पुराचे पाणी जाऊ नये यासाठी पाहणी करण्यात आली.
यामध्ये काय उपाय योजना करता येतील याबाबत सर्व विभागाचे मत घेतले जाणार आहे. त्यानंतर कोणत्या विभागाने कोणती कामे करायची याबाबत सुचना दिल्या जाणार आहेत.
यावेळी तहसीलदार अरविंद बोळनगे, मंडळ अधिकारी शिंदे, तलाठी गरुड, सरपंच राजेश इंगोले, छावा युवा जिल्हाअध्यक्ष विजेंद्र भैया क्षीरसागर व ग्रामस्थ उपस्थित होते. या टीमने मुख्यनदीच्या पुलावर जाऊन पाहणी केली. गावातील ग्रामपंचायत कॉम्प्लेक्स जवळील पुलाची पाहणी केली तसेच सेलू पांदन व कुरुंदवाडी कडून येणाऱ्या नदीपात्राची सुकळी रोड पुलावर जाऊन तेथील पाहणी केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय कुरुंदा येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.