परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात . महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना ? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का ? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका . तुम्ही हे का बोलताय ; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही . मराठी माणसाला डिवचू नका , इतकंच आत्ता आपल्याला सांगतो . जय महाराष्ट्र !
कोश्यारींची होशियारी ? आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका - राज ठाकरे
शनिवार, जुलै ३०, २०२२
0