उपचारासाठी पुराच्या पाण्यातुन जीवघेणा प्रवास तोहगाव येथिल थरारक घटना.
गोंडपीपरी तालुक्यात मागील सात दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच वर्धा नदीला पूर आल्याने तोहगाव गावाला बेटाचे रूप आले आहे.
अश्यातच गावातील 18 वर्षीय युवक साहिल कालिदास वाघाडे याला ताप आल्याने उपचारा साठी प्राथमिक आरोग्य केंद्र तोहगाव येथे दाखल करण्यात आले.
मेंदूज्वर झाला असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी जिल्ह्या सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यास सांगितले.
मात्र गावला पुराच्या पाण्याने वेढले असल्याने न्यायचे कसे असा प्रश्न वाघाडे कुटूंबियाना पडला. याबाबतची माहिती गावचे उपसरपंच फिरोज पठाण यांना दिली असता उपसरपंचानी गोंडपीपरी तहसीलदाराना भ्रमण ध्वनी करून या बाबतची माहिती दिली.
तहसीलदाराणी तत्परता दाखवत रुग्णवाहिक घेऊन येणार असल्याचे सांगितले.
रुग्णाला पुराच्या पाण्यातून डोंग्याने पलीकडे आणण्याचे आले.
कन्हाळगाव अभियारण्यातिल
घनदाट जंगलातुन प्रवास करत
गोंडपीपरी चे तहसीलदार के.डी. मेश्राम यांनी -कन्हाळगाव मार्गाने रुग्णवाहिके सोबत स्वतः हजर झाले.
मात्र रस्त्यावर मोठे झाड उन्मळून पडल्याने रुग्णवाहिका जाऊ शकली नाही. याबाबतची माहिती वाघाडे कुटूंबियाना देण्यात आली
अखेर, नाईलास्तव तोहगावातून उपचारासाठी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आलेल्या रुग्णावर माघारी जान्याची वेळ आली.
कोरपना चंद्रपूर
प्रतिनिधी मनोज गोरे