प्रतिनिधी : गजानन वानोळे
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन ईटनकर व सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार आणि किनवटच्या तहसिलदार डॉक्टर मृणाल जाधव यांनी आज तालुक्यातील किनवट,शिवनी, अप्पारावपेठ भागाचा दौरा करून येथील पूरजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन नुकसान झालेल्या शेती पिकांची पंचनामे करण्याचे आदेश देऊन निजामकालीन तलावाची देखील पाहणी केली.
यावेळी किनवटचे सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव किनवट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष धनवे , तालुका आरोग्य अधिकारी मुरमुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य. सर्यकांत आरंडकर , भाजपाचे तालुका सरचिटणीस बालाजी आलेवार, मंडळ अधिकारी एस. एन. माळोदे , तलाठी अविनाश करंदीकर, लघु पाटबंधारे विभागाचे कॅनल निरीक्षक महेंद्र सिटीकर , अपारावपेठ येथील सरंपच शेख अब्दुल रब, विनायक देशमुख , भोजा रेड्डी, पोलिस पाटील भुमारेड्डी, शिवराम जाधव यांच्यासह गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते