Type Here to Get Search Results !

भाजपा कोल्हापूरच्या वतीने टाहो मोर्चा काढण्यात आला.

काही वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्याला सातत्याने पुराचा तडाखा बसतोय. गेल्या वर्षी महापुरात मोठं नुकसान झालं, तरी अजूनही त्याची भरपाई मिळालेली नाही.




 पावसाळा तोंडावर आला तरी, संभाव्य पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना नाहीत. त्यामुळे आज भाजपा कोल्हापूरच्या वतीने टाहो मोर्चा काढण्यात आला.





दसरा नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा या मोर्चाची सुरुवात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. कोल्हापूर शहर तसंच जिल्ह्यातील माता-भगिनींनी टाहो मोर्चात उत्स्फूर्त सहभाग घेत आपला आक्रोश शासन दरबारी मांडला.




जनतेचा हा आक्रोश ऐकून राज्य सरकार जागे होईल का, हा प्रश्नच आहे. तरीही जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवून सरकारला जाब विचारण्यासाठी आजचा हा मोर्चा होता. या मोर्चाला कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मोर्चानंतर मागण्यांचं निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad