Type Here to Get Search Results !

वसमत | एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही - राजू चापके

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. राजू चापके




वसमत तालुक्यातील कुरुंदा व गिरगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे केले जात असून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी शासनाने पाठपुरावा करण्याचे आश्वासन शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू चापके यांनी शेतकऱ्यांना दिले. 




वादळी वाऱ्याचा तडाख्याने केळी बागांना मोठा फटका बसला आहे. हाती आलेली बाग उध्वस्त झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले. दरम्यान तहसीलदार अरविंद बोंळगे, तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याण पाड यांच्यासह महसूल विभागाच्या पथकाला सोबत घेत तालुका प्रमुख राजू चापके यांनी परिसरात नुकसानीची पाहणी केली.


 यावेळी राजू चापके यांच्यासह देविदास कऱ्हाळे, विलास नादरे, सुनील नादरे, रवी नादरे, शंकर कऱ्हाळे, मच्छिंद्रनाथ साळुंखे, प्रमोद नादरे, व्यंकटेश कऱ्हाळे, बाळु कऱ्हाळे, सतीश नादरे, बंडू कऱ्हाळे, बद्रीनाथ कदम, गंगाधर शिवणकर, पिंटू कऱ्हाळे यासाह शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी चापके यांनी गिरगांव येथील तीन ग्रामस्थांना आर्थिक मदत केली. या ग्रामस्थांचे संपूर्ण घर कोसळल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले होते. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत म्हणून चापके यांच्या कडून रोख रक्कम देण्यात आली. तसेच चापके यांनी वीज कंपनीच्या अभियांत्याशी संपर्क साधून तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सुचना दिल्या.


वादळी वाऱ्यामध्ये गिरगांव येथील प्रकाश कऱ्हाळे, पिराजी कऱ्हाळे गंगाधर कऱ्हाळे यांचे मोठे नुकसान होऊन संसार उघड्यावर आला आहे. हा प्रकार पाहून शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू चापके यांनी स्वतः आर्थिक मदत केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad