फतियाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फूले यांची जयंति उत्साहात सजरी.
बाबासाहेबांचे विचार हे जीवनलक्षी ध्येय साध्यकरण्यासाठी उपयूक्त आहे.-प्रा.शिवाजी गायकवाड
प्रतिनीधी दौलताबाद :- प्रकाश लकडे
फतीयाबाद.येथिल साठेनगर येथिल गौतम बुद्ध विहारात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फूले यांची संयूक्तपणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हनून दौलताबादस्टेशनच्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी प्रमुख वक्ते प्राध्यापक शिवाजी गायकवाड यांनी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र आणि समाज "या विषयी व्याख्यान दिले.त्यावेळी ते म्हणाले की,बाबासाहेबांचे विचार तळागळातिल वंचित घटक आणि समाजोद्धार व जीवनलक्षी ध्येय साध्य करण्यासाठी होते.
ते विचार डोक्यात घेण्याची आणि त्याप्रमाणे अनूकर कराण्याची आवश्यकता आहे.यानंतर सुरेश गायकवाड व जनार्दन गवळी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी संयोजक बबन साठे रिपब्लिकन सेना उपाध्यक्ष,फतियाबाद तंटामुक्ती उपाध्यक्षा रंजना साठे ,जंभाळा येथिल माजी सरपंच सुशीला गेहलोत.यावेळी सरपंच ,उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक, पोलीस उपनिरीक्षक गोवर्धन चव्हाण,गोविंद नाईक,कैलास निळे,विलास ठील्लारे,प्रवीण भास्कर ,शेख अझीम,अझहर पटेल,कृष्णा भालेराव समिती अध्यक्ष, अविनाश काटकर उपाध्यक्ष, कृष्णा मोरे सचिव, नितीन जाधव सदस्य : बाळू गायकवाड, रवी जाधव,चैनसिंग ठाकूर, विठ्ठल जाधव,विजय बनसोडे, करणं जाधव,विजय साठे,बाबू जाधव,अक्षय गायकवाड, बबन जाधव,किशोर जाधव,कैलास गायकवाड, सनी शेजवळ, अनिल देशमुख, सुनील साठे,लक्ष्मण गायकवाड, बाबासाहेब जाधव,रोहन जाधव आदिंची मोठी उपस्थिती होती. प्रतिनिधी प्रकाश लकडे