दोन रोहींचा विहीरीत पडून मृत्यू निंगनूर शिवारातील घटना
प्रतिनिधी निगंनूर : - मैनुद्दीन सौदागर
पाणवठ्याच्या शोधात दाही दिशा भटकंती करत गाव शिवारात आलेल्या दोन रोहींचा विहीर पडून दुर्दैवी अंत झाला .
सदर घटना दि. २२ एप्रील रोजी संध्याकाळी ८ वाजताचे सुमारास निंगनुर खंड - २ शिवारातील माधव जाधव यांच्या मालकीच्या शेत सर्व्हे ३३४ या शेतात घडली . तिव्र उन्हाळ्यात तहानेने व्याकुळलेले वन्यजीव तहान भागविण्यासाठी पाणवठ्याच्या शोधात जंगलातून गावाकडे मोठ्या प्रमाणात धाव घेत आहे .
अशाच तहानलेली दोन रोहींच्या जोडी खोल विहीरीत पडल्याने त्यांचा विहीरीतच मृत्यू झाला ही घटना शेत मालक माधव जाधव यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ कळविल्यावरून वन विभागाचे फुलसावंगी येथील क्षेत्र सहाय्यक एस. एस जोग, अमडापूरचे वनरक्षक व्ही . एस . घुल्ले , दगडथर बीटचे वनरक्षक वाय बी गायकवाड , चिल्ली बीटचे आर टी . फोपसे बोरगाव बीटचे व्ही एम कर्नल यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत्त रोहींना विहीरी बाहेर काढून घटनास्थळ पंचनामा केला आहे.
यावेळी गावातील माजी सरपंच बिरजुलाल मुडे माजी सरपंच बालाजी महाले माजी उपसरपंच अंकुश राठोड. तसेच मधुकर जाधव. रवि मुडे.सुभाष मुडे.सुरेश जाधव. राम राठोड. अनिल मुडे हे सर्व हजर होते