Type Here to Get Search Results !

जोतिबा यात्रेसाठी येणा-या भाविकाकरिता ई पास ची सक्ती रद्द करून देवस्थान मंदिराचे चारही दरवाजे दर्शनासाठी खुले करावे - राजू शेट्टी

जोतिबा यात्रेसाठी येणा-या भाविकाकरिता ई पास ची सक्ती रद्द करून देवस्थान मंदिराचे चारही दरवाजे दर्शनासाठी खुले करावे



या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाकडे शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून तोडगा काढावा अन्यथा आंदोलनाचे स्वरूप बदलून आंदोलन चिघळत गेल्यास भाविकांच्या गैरसोयीस शासन व प्रशासन जबाबदार असेल.




गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे भाविकांच्या होणा-या गैरसोयीसाठी जोतिबा ग्रामस्थ व पुजारी यांनी सुरू केलेल्या या आंदोलनामध्ये आंदोलकांची भुमिका योग्य आहे.प्रशासन व ग्रामस्थ यांचेतील गैरसमजुतीमुळे आंदोलन करण्याची वेळ ग्रामस्थ , दहा गावकर व पुजारी यांचेवर आलेली आहे.


एकीकडे पंतप्रधानांच्यापासून ते राज्यातील मंत्र्यापर्यंत सर्वजण राजरोसपणे हजारो लाखोच्या सभा करत आहेत, निवडणुक घेत आहेत , विजयी मिरवणुका निघत आहेत. प्रशासनाकडून त्याठिकाणी कोणतेच निर्बंध घातले जात नाहीत. प्रशासनाकडून निर्बंधाच्या नावाखाली भाविकांना ई पासच्या केलेल्या सक्तीमुळे गर्दी वाढत असून दररोज १ तासात २ हजार पास दिले जातात मात्र यामध्येही बोगसगिरी केली जात असून कोणतीच माहिती न घेता माझ्यासह पंतप्रधान , मुख्यमंत्र्यांचे बोगस पास काही सेकंदातच याठिकाणी काढले गेले.


जोतिबा यात्रेच्यानिम्मीत्ताने चैत्रास दररोज २ लाख भाविक येतात व प्रशासनाकडून मात्र दररोज २४ हजार भाविकांनाच पास देण्याची क्षमता आहे. सध्या ग्रामस्थ , पुजारी व दहा गावकर यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे देवस्थान ठिकाणी संपुर्ण व्यवहार व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने भाविकांची गैरसोय होऊ लागली आहे.सर्व घटनेची माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिसप्रमुख यांना देऊन उद्या बैठक घेऊन यामध्ये तातडीने तोडगा काढणेबाबत सुचित केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई , सुनिल नवाळे ,सरपंच सौ. राधा बुबणे , शंकर दादर्णे , गोरख बुबणे यांचेसह ग्रामस्थ व पुजारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad