आज कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ/सर्किट बेंच व्हावे यासाठी मा.विधानपरिषद सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब )
यांच्या पुढाकाराने मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी व सहा जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची विधानभवन येथे बैठक संपन्न झाली.
सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कोल्हापूर खंडपीठ आणि सर्किट बेंचसाठी आपली सकारात्मकता दर्शवली असून याबाबतचे पत्र आज उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना पाठविण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.
या बैठकीस, यावेळी, परिवहन मंत्री ना. अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अनिकेत तटकरे, आमदार अरुण लाड, आमदार शेखर निकम, आमदार रणजित मोहिते पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार प्रकाश अबिटकर आदी मान्यवर उपस्थित होते.