परभणी लोकसभा निवडणुकीत उभे असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.महादेव जानकर साहेबांना हटकर,धनगर,मराठा,ओबिसी समाज बांधवांनी आपल्या हक्काचा माणूस समजून जास्तीत जास्त मतदान करावे.कारण महादेव जानकर साहेब हे आपल्या समाजा पुरते नेते नाहीत ते बहुजनांचे नेतृत्व करतात हे सर्वांना माहित आहे सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे म्हणून नेहमीच आक्रमक असतात.
मराठा,धनगर-हटकर,मुस्लीम, समाजाला आरक्षण द्या म्हणून नेहमीच आक्रमक भुमिका असते.तसेच शेतकरी बळीराज्याच्या शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून नेहमी च प्रयत्न करतात.असा आपला माणुस दिल्ली संसदेत पाठवणे गरजेचे आहे. सध्या महाराष्ट्र जाती जातीचे राजकारण चालु आहे.परभणी लोकसभा निवडणुकीत आपल्या धनगर हटकर व ओबीसी समाजाचे खुप मोठ्या प्रमाणात मतदान आहे. मराठा समाज मुस्लिम समाज सुध्दा साहेबांना सहकार्य करण्यासाठी पुढे आला आहे.सर्वांनी मतभेद बाजुला ठेवून आपल्या हक्काचा माणूस निवडुन आला पाहिजे असा ठाम निर्णय घेतला तर लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होतील.
चालु परिस्थिती मध्ये ज्या समाजाचा नेता असेल तर त्या समाज बांधवांला मान सन्मान मिळेल शिवाय शासकीय कामं होऊन आर्थिक परिस्थिती सुधारण्यास फायदा होईल.यासाठी आपला माणुस सत्तेत असणे गरजेचे असल्याने परभणी लोकसभा निवडणुकीत उभे असलेले महादेव जानकर साहेबांना विक्रमी मतांनी निवडुन आणावे..
असे आव्हान हटकर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील यांनी केले आहे