'मनोज जरांगेच्या मागून कोण बोलतंय हे लवकरच समोर येईल'
मनोज जरांगे यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगतेय, हे लवकरच समोर येईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंनी राज्य सरकार, अजित पवार व शरद पवारांवर निशाणा साधला. निवडणुकीच्या तोंडावर असे जातीय तणाव होत आहेत. स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असणे हे होत होते महाराष्ट्रात, पण दुसऱ्याच्या जाती बद्दल द्वेष निर्माण करणे हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाले. यांच्या स्वार्थापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतोय हे लोकांना कळत नाही, असेही ते म्हणाले.