एकनाथ शिंदे आणि अजितदादा बरोबर गेलेले सगळे लोक हे सत्ता गेल्यानंतर अजून कुठे जातील हे कळणारही नाही. मात्र सामान्य जनता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दिसते. मी महाराष्ट्रभर फिरलो आहे. काँग्रेस पक्षाचे नेते शहाणपणाने वागले तर त्यांना चांगले दिवस येतील, असे स्पष्ट मत भाजप महायुतीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले. रासप आता प्रत्येक निवडणूकीत उमेदवार उभा करणार अशी माहिती देखील विट्यात त्यांनी यावेळी दिली