दोन दिवसांपूर्वी माळशिरस येथील पाटबंधारे विभागाला रयत क्रांती संघटनेने तोंडले बोरगाव माळखांबी येथील बंधाऱ्यात पाणी सोडा असे लेखी निवेदन दिले होते त्या निवेदनाची दखल घेऊन पाटबंधारे विभाग माळशिरस यांनी तातडीने तोडले येथील बंधाऱ्यात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेल्या आहे.
यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आम्ही रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग यांना तोंडले बोलले येथील बंधाऱ्यात पाणी सोडा असे निवेदन दिले होते त्यामुळे त्यांनी आज पाणी सोडलेले आहे त्यामुळे पांटबधारे विभाग यांचे आभार मानत आहोत रणजीत चव्हाण शेतकरी