मागील अनेक दिवसांपासून वीज ग्राहकांची फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. मागील महिन्याचे वीजबिल भरले नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठाबंद करण्यात येईल. ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा. अशा प्रकारचे खोटे मेसेज वीज ग्राहकांना पाठविण्यात येत आहे. अशा फसव्या मेसेजला कोणीही प्रतिसाद देऊ नये. महावितरण कोणत्याही मोबाईल नंबरवरून असे संदेश पाठवत नाही. असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.