धुमाकूळ घालणाऱ्या चारपैकी एक बिबटला जेरबंद गुजरात-महाराष्ट्र वनविभागाची कारवाई
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गुलीउंबर येथे महाराष्ट्र गुजरात सीमेवरील चाटुवाड गावाजवळ चार पैकी एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश, गुजरात व महाराष्ट्र वनविभागाची संयुक्त कारवाई, अजूनही शेतकरी व नागरिकांमध्ये अजून इतर तीन बिबटे मोकळे असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण. नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवरील अक्कलकुवा तालुक्यातील गुलिआंबर चाटुवाड, खापर, ब्राह्मणगाव या गावांमध्ये मागील गेल्या अनेक दिवसापासून चार बिबट्यांचा वावर असल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे, मागील गेल्या आठवड्याभरत खापर येथील दोन गाई व ब्राह्मणगाव येथील दोन गाईंचा या बिबट्यांनी फडशा पाडून ठार केल्या आहेत, खापर आणि ब्राह्मणगाव दरम्यान असलेल्या गोशाळेला सर्वात आधी या बिबट्यांनी लक्ष केले होते, या गावांमधील ग्रामस्थांनी महाराष्ट्र शासनाच्या अक्कलकुवा तालुक्यातील वनविभागाला निवेदन देऊन सदर बिबट्यांना बंदोबस्त करून जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती, परंतु अक्कलकुवा वनविभागाच्या पथकाकडून बिबट्याला जेरबंद करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत होते, याच बिबट्याद्वारे गुजरात राज्यातील अनेक गावांमध्ये देखील मानवी जीवनास व पाळीव प्राण्यांना धोका निर्माण झाला होता, अखेर गुजरात वनविभागाच्या पथकाने पिंजरा लावून आज सकाळी एका बिबट्याला जेरबंद केले आहे, दरम्यान महाराष्ट्राच्या वन विभागाच्या पथकाने देखील घटनास्थळी दाखल होत कारवाईत सहकार्य केले आहे, या परिसरात एकूण चार बिबट्यांचा वावर असून त्यापैकी एक बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असले, तरीदेखील अद्यापही तीन बिबटे या परिसरात मोकाट फिरत असून, वनविभागाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे, बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ शेतातील कामे करण्यासाठी देखील धास्तावले आहे, शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले आहे, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे वन विभागाने सदर बिबट्यांना जेरबंद करून ग्रामस्थांना वन्य प्राण्यांपासून असलेला धोका कमी करावा, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.