रब्बीच्या नुकसानी साठीही ७२ तासांची अट; नुकसान झाल्यास तक्रार करा
सोयगाव तालुक्यात झालेले वादळी वाऱ्याचा तडाख्यात नुकसान...
सोयगाव, दि.२२...सोयगाव सह तालुक्यात अचानक झालेल्या वादळी वाऱ्याचा तडाख्यात नुकसान झालेल्या रब्बी उत्पादक शेतकऱ्यांना ७२ तासात नुकसानीची माहितीची तक्रार पुन्हा अनिवार्य करण्यात आली आहे त्यामुळे वादळी वाऱ्याचा तडाख्यात बाधित शेतकऱ्यांनी तातडीने विमा कंपनी कडे ७२ तासांत तक्रार नोंदवावी अशी माहिती महसूल कडून रविवारी देण्यात आली आहे,
सोयगाव तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यात रब्बीच्या पिके आडवी पडली आहे वादळ चा तडाखा सोयगाव जरंडी बनोटी या मंडळांना बसलेला असून यामध्ये एक हजार ५४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्या चा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला आहे दरम्यान बनोटी तिखी निमखेडी उमरविहिरे जरंडी सोयगाव जंगली कोठा आणि बोरमाळ तांडा या गावांना वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला आहे महसूल आणि कृषी विभागाकडून रब्बीच्या मका सूर्यफूल ज्वारी या आडव्या पडलेल्या रब्बीच्या पिकांची नुकसानी ची संयुक्त पंचनामे करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे
रब्बीच्या पिकांचा बिमा काढलेल्या शेतकऱ्यांना ७२ तासांचा अल्टोमेंटम
रब्बीच्या मका ज्वारी बाजरी भाजीपाला आदी पिकांचे वादळी वाऱ्याचा फटक्यात नुकसान झाले असल्यास विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने ७२ तासात नुकसानी ची तक्रार विमा कंपनीच्या पोर्टलवर नोंदवावी असे आवाहन तहसीलदार रमेश जसवंत यांनी केली आहे त्यामुळे खरिपाप्रमाणे रब्बीच्या उत्पादक शेतकऱ्यांनाही नुकसानीच्या तक्रारी साठी ७२ तासांची मुदत देण्यात आली आहे सोयगाव तालुक्यात नऊ हजार ६५ हेक्टर वर रब्बी ची लागवड करण्यात आली आहे