Type Here to Get Search Results !

शुरवीर संभाजी करवर यांचा इतिहास तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणार - भिमराव भुसनर पाटील



शुरवीर संभाजी करवर यांचा इतिहास तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणार - भिमराव भुसनर पाटील

प्रतिनिधी विनोद धुमाळ जांबुड

 जांबुड ता माळशिरस येथे अखंड हिदुस्थानचे दैवत,रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे दहा अंगरक्षकापैकी एक शुरवीर संभाजी करवर यांच्या जंयतीच्या निमीत्ताने प्रतिमेचे पूजन जांबुड गावचे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मा.नारायण पाटील सरपंच मा.राहुल खटके,भारतीय जनता पार्टी चे नुतन ग्रामपंचायत सदस्य मा.शिवाजी केचे पाटील मा.सतीश पवार मा.सचिन चंदनशिवे ,भाजपा जेष्ठ नेते मा.मुरलीधर कचरे, रिपाइं आठवले युवक माळशिरस तालुका अध्यक्ष रविराज बनसोडे, दलित महासंघ युवक तालुका अध्यक्ष मा.प्रदिप नाईकनवरे, हटकर समाज महासंघाचे मार्गदर्शक मा.तुकाराम (आप्पा) हांडे, मा.श्रीमंत व्हरगळ साहेब, मा.उपसरपंच शिवसेना नेते मा.महावीर माने, पत्रकार मा.विनोद धुमाळ ,अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे मा.आप्पासाहेब खांडेकर, मा.अभिजित केचे अष्टपैलू क्रिकेटपटू मा.महावीर बनसोडे मा.दत्तात्रय चंदनशिवे मा.राम कचरे मा.बापु माने व ग्रामस्थ यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी प्रास्तविक करताना हटकर समाज महासंघाचे संस्थापक/अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील म्हणाले, अखंड हिदुस्थानच्या जनतेचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वास दहा अंगरक्षकापैकी एक शुरवीर संभाजी करवर हे शूर पराक्रमी होते. शुरवीर संभाजी करवर यांचा सहवास आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे आढळुन येतो.तेथे आजही वाडा अस्तित्वात आहे.हटकर वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बरोबर प्रतापगडावरील अफजल खान भेटीचा इतिहास तसेच ठिकाणी च्या लढाई मावस भाऊ व्यंकोजी राजे यांच्या कर्नाटकात तंजावर व नाशिक जिल्ह्यात उस्मानाबाद जिल्हात राघुचीवाडी हे शुरवीर संभाजी करवर यांचे गाव.पुर्वीच्या काळात लढाई वेगवेगळ्या भागात होत होत्या त्यामुळे पराक्रमी मावळे हे महाराजांच्या बरोबर असायचे त्या काळात दोन,तीन,लग्न करायचे त्यामुळे शुरवीर संभाजी करवर यांचे वारस जसे राघुचीवाडी येथे आहेत तसेच वारसदार नाशिक जिल्ह्यात सुद्धा आहेत.पण कोणताही भेदभाव न करता आपल्या राजाची जंयती सर्व जण एकत्र येऊन गावातील सर्व राजकीय नेते मंडळींनी बरोबर घेऊन जंयतीचे नियोजन केले जाते.पुर्वी इतिहास लेखकांनी काही शुर पराक्रमी मावळेचं इतिहासात लिखाण केले नाही. पण आपल्या पुर्वजांनी जशाचा तसा इतिहास प्रत्येक पिढ्यांन पिढ्यांना सांगितल्यामुळे शुरवीर संभाजी करवर सारखे अनेक मावळे प्रसिद्धीस आले नाहीत. किंवा त्यांनी स्वराज्य साठी दिलेल्या योगदानाची दख्खल घेतली नाही.त्यामुळे अशा शुर मावळ्यांच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा मिळाला पाहिजे.म्हणून आपण सर्व जण सर्व पक्षाचे व संघटनेचे नेते मंडळी ना एकत्र करून जंयतीचे नियोजन करत असतो.यानंतर जेष्ठ नेते मा नारायण पाटील यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे युवक माळशिरस तालुका अध्यक्ष मा. रवि बनसोडे पत्रकार यांनी केले तर आभार प्रदर्शन नाभिक संघटनेचे युवा नेते व रिपाइं आठवले पक्षाचे जांबुड शहर अध्यक्ष अभिषेक भोसले यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad