नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत छत्रपती संभाजी राजे यांना धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते असे आपल्या भाषणातून वक्तव्य केल्याने त्यांचा राज्यातील समस्त हिंदू समाजातर्फे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष व राज्यातील सर्व हिंदू प्रेरित संघटनातर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला असून, त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील तमाम हिंदू मावळ्यांचे मन दुखावले असल्याने आज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात त्यांचा निषेध करत पुतळा दहन करण्यात आले, सदर पुतळा दहन कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले, यावेळी नंदुरबार जिल्हा महामंत्री निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील , जितेद्र जमदाळे,शहराध्यक्ष विनोद जैन, तालुका अध्यक्ष शशीकांत पाटील, ईश्वर पाटील,तालुका सरचिटणीस हिम्मतसिग गिरासे, लक्ष्मीकांत वसावे,महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नंदा सोनवणे,भावना लोहार,कल्पना पंड्या, रोहिणी भावसार व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.